या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या नम्रता दुर्गवंश, सुषमा बैस आणि जया ठाकूर यांनी प्रशिक्षण पूर्ण होताच बल्लारपूर शहरात स्वतःचा "फूड कॉर्नर" व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाकडे यशस्वी वाटचाल केली असून, अमृतच्या कौशल्य विकास उपक्रमाचे हे प्रेरणादायी यश ठरले आहे.
अमृत संस्थेच्या बेकरी प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना बेकरी उत्पादनांची प्रत्यक्ष निर्मिती, केक, बिस्किटे, ब्रेड, पाव, स्नॅक्स आदी खाद्यपदार्थ तयार करण्याची आधुनिक पद्धत, स्वच्छता व गुणवत्ता नियंत्रण, आकर्षक पॅकेजिंग, ग्राहक सेवा, विक्री कौशल्य तसेच लघुउद्योग उभारणी आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे सखोल मार्गदर्शन देण्यात आले. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञान आणि कौशल्याच्या बळावर नम्रता दुर्गवंश, सुषमा बैस आणि जया ठाकूर यांनी बल्लारपूर येथे स्वतःचे फूड कॉर्नर सुरू केले. आज त्यांच्या व्यवसायात विविध प्रकारचे बेकरी पदार्थ, फास्ट फूड आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री होत असून ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या व्यवसायामुळे त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले असून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. यावेळी नम्रता दुर्गवंश, सुषमा बैस आणि जया ठाकूर यांनी आपल्या यशाचे श्रेय अमृत संस्थेच्या बेकरी प्रशिक्षणाला देत अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विक्रममोहन पांडे तसेच अमृत मित्र सतीश नारायणदास यांचे विशेष आभार मानले. "अमृत संस्थेने आम्हाला केवळ बेकरी पदार्थ तयार करणे शिकवले नाही, तर स्वतःचा व्यवसाय कसा उभारायचा, ग्राहकांचा विश्वास कसा जिंकायचा आणि स्वावलंबी कसे व्हायचे हेही शिकवले. आज आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत, याचे सर्व श्रेय अमृतच्या दर्जेदार प्रशिक्षणाला, जिल्हा व्यवस्थापक विक्रममोहन पांडे यांच्या मार्गदर्शनाला आणि अमृत मित्र सतीश नारायणदास यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याला जाते," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. अमृत संस्थेचे उद्दिष्ट केवळ प्रशिक्षण देणे नसून प्रशिक्षणार्थींना यशस्वी उद्योजक बनविणे हे आहे. संस्थेच्या नियोजनबद्ध प्रशिक्षण पद्धती, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांमुळे अनेक युवक-युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत आहे. नम्रता दुर्गवंश, सुषमा बैस आणि जया ठाकूर यांची ही यशोगाथा अमृत संस्थेच्या कौशल्याधारित प्रशिक्षणाची परिणामकारकता अधोरेखित करणारी असून इतर युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कौशल्य, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळवता येते, हे या तिघींनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - अमृत जिल्हा कार्यालय, चंद्रपूर 9112228774, 9607443742 पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402 ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, वत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार, राजपूत इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment