आपण सारे एक जानेवारी हा दिवस आंग्ल वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतो; पण हा दिवस आणखी एका कारणाने प्रसिद्ध आहे. हा दिवस कल्पतरू दिन अर्थात कल्पतरू दिवस किंवा कल्पतरू उत्सव म्हणून ओळखला जातो.
आपल्या संस्कृतीत कल्पतरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कल्पतरू म्हणजे आपल्या भावना ओळखणारा, आपल्याला मार्गदर्शन करणारा अर्थात गुरू. आपल्याला आयुष्यातील साध्या घटना, प्रसंगातून मार्ग दाखवणारा तो गुरू.
आपण सारे एक जानेवारी हा दिवस आंग्ल वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतो; पण हा दिवस आणखी एका कारणाने प्रसिद्ध आहे. हा दिवस कल्पतरू दिन अर्थात कल्पतरू दिवस किंवा कल्पतरू उत्सव म्हणून ओळखला जातो. रामकृष्ण मठ या संन्यासी परंपरेतील भिक्षू, तसेच रामकृष्ण मिशन आणि जगभरातील वेदान्त सोसायटी अनुयायांकडून हा दिवस दर वर्षी महत्त्वाचा धार्मिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. या सर्व संस्था १९व्या शतकातील भारतीय संत, योगी व हिंदू पुनरुत्थानातील महान विभूती श्रीरामकृष्ण परमहंस यांचे अनुयायी आहेत.
हा उत्सव एक जानेवारी १८८६ या दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भक्तांच्या श्रद्धेनुसार, याच दिवशी श्रीरामकृष्णांनी काशीपूर उद्यानात स्वतःचे पृथ्वीवरील ईश्वराचे साकार रूप—प्रकट केले. घशाच्या कर्करोगाच्या उपचारांच्या अंतिम टप्प्यात असताना शांततेसाठी रामकृष्णांनी तेथे आश्रय घेतला होता. या दिवशी त्यांच्या काही अत्यंत भाग्यवान शिष्यांसमोर एक अद्वितीय चमत्कार घडला. त्यामुळे त्यांच्या ईश्वरस्वरूपाची अंतिम पुष्टी झाली. हा प्रसंग शिष्यांसाठी आध्यात्मिक अनुभूती देणारा होता. म्हणून ज्या दिवशी ही दैवी घटना घडली, तो 'कल्पतरू दिन' म्हणून ओळखला जातो. (या प्रसंगाच्या काही महिन्यांनंतर, १६ ऑगस्ट १८८६ रोजी श्रीरामकृष्ण यांनी महासमाधी घेतली.)
त्या दिवशी त्यांनी त्यांचे शिष्य गिरीश यांना विचारले, “गिरीश, तू माझ्यात असे काय पाहिले आहेस, की मला सर्वांसमोर ईश्वराचा अवतार म्हणून घोषित करतोस?” ते गुरुचरणी लीन होऊन, हात जोडून म्हणाले, “ज्याच्या महिम्याचे मोजमाप व्यास आणि वाल्मिकीसारखे ऋषीसुद्धा पूर्णपणे करू शकले नाहीत, त्या परमेश्वराविषयी माझ्यासारखा तुच्छ मनुष्य काय सांगणार?” हे ऐकून श्रीरामकृष्ण अत्यंत भावविवश झाले. ते म्हणाले, “मग मी आणखी काय सांगू? मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. प्रकाशित व्हा!” ते आध्यात्मिक अवस्थेत गेले. त्यांच्या पावन स्पर्शाने प्रत्येक भक्ताने अवर्णनीय आनंद अनुभवला. कोणी हसले, कोणी रडले, कोणी ध्यानात तल्लीन झाले, कोणी प्रार्थना करू लागले. काहींना दिव्य प्रकाश दिसला, काहींना आपल्या इष्टदेवतेचे दर्शन झाले, तर काहींना आपल्या शरीरात आध्यात्मिक शक्तीचा प्रवाह जाणवला. त्यांच्या मनात एकच तीव्र भावना उरली—स्वतःच्या दुःखाशी तादात्म्य पावलेली, करुणेने ओसंडून वाहणारी मातेसारखी दैवी सत्ता स्वर्गातून खाली उतरून त्यांना संरक्षणासाठी प्रेमाने हाक देत आहे.”
ही दैवी घटना याच दिवशी घडली आणि या दिवसाची आठवण म्हणून एक जानेवारी हा दिवस कल्पतरू दिन म्हणून साजरा करतात.
(संकलित)
..........
(या संदर्भातील दुसरा लेख वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=336)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment