स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्ण अध्याय: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ‘प्रतिसरकार’च्या स्थापनेला आज ८३ वर्षे पूर्ण
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात साताऱ्याच्या भूमीने दिलेले योगदान अद्वितीय आहे. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला उघड आव्हान देत क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ ऑगस्ट १९४३ रोजी सातारा जिल्ह्यात ऐतिहासिक ‘प्रतिसरकार’ (पत्री सरकार) ची स्थापना केली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ११ ऑगस्ट रोजी ८३ वर्षे पूर्ण होत असून, संपूर्ण सातारा जिल्ह्यात हुतात्म्यांच्या आणि क्रांतीकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे.
पत्रीसरकार नाव कसे पडले? इंग्रजांचे खबरी आणि जुलमी अधिकाऱ्यांना प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांकडून तळपायाला काठ्यांनी मारण्याची किंवा लोखंडी पत्रे ठोकण्याची शिक्षा दिली जायची. या धाकामुळे इंग्रजी राजवटीची साखळी पूर्णपणे कोलमडली आणि या सरकारला लोकभाषेत ‘पत्री सरकार’ असेही संबोधले जाऊ लागले. साताऱ्यातील हजारो चौरस किलोमीटरचा परिसर ब्रिटीश प्रभावापासून मुक्त झाला होता.
सातारा जिल्ह्याचा अभिमान
प्रतिसरकारच्या या अभूतपूर्व प्रयोगाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात स्वातंत्र्याची नवी चेतना निर्माण केली. आज ११ ऑगस्टच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील आणि प्रतिसरकारच्या वीरांना अभिवादन करण्यात येत असून, त्यांच्या क्रांतीगाथेचे स्मरण केले जात आहे.
श्री. विनायक पाठकजी, जिल्हा व्यवस्थापक अमृत सातारा 9112227638
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment