सन १९६५ व १९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणारे-जनरल अरुणकुमार वैद्य

जनरल वैद्य ही एक अशी असामी होती ज्यांनी १९६५ व १९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवुन सन्मान मिळवले होते. ते भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या अतुलनीय शौर्याची माहिती-

सन १९६५ व  १९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणारे-जनरल अरुणकुमार वैद्य  मुख्य फोटो
मुख्य फोटो

त्यांचा जन्म. २७ जानेवारी १९२६ अलिबाग येथे झाला. जनरल अरुणकुमार वैद्य यांचे वडील अलिबागचे कलेक्टर म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण इंडस्ट्रीज हायस्कूल अलिबाग येथे, व कॉलेज शिक्षण एलफिन्स्टन कॉलेजमध्ये झाले.

त्याचप्रमाणे ४ वर्षे पुण्यात रमणबागेतही शिक्षण झाले. शिक्षण चालू असताना मिलिटरीत जाण्याची त्यांना विलक्षण ओढ होती. सन १९४४ साली त्यांनी इमरजन्सी कमिशन मिळवले व ३० जानेवारी १९४५ ला त्यांना कायम कमिशन मिळाले.

त्यांना रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले. जनरल वैद्य ही एक अशी असामी होती ज्यांनी सन १९६५ व १९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवुन सन्मान मिळवले होते. ते भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते.

सन १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्रपुरस्कार मिळाला. नंतर सन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. १९६५ चा खेमकरणचा पाकिस्तान बरोबरचा लढा मोठा अविस्मरणीय झाला. पाकिस्तानची पहिली सशस्त्र पलटण आत घुसली होती. त्या सैन्याला घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करून ३६ तास रणकंदन करून पाकिस्तानचे एम्४७ व एस् ४८ हे प्रचंड पॅटन रणगाडे त्या काळी लेफ्टनंट कर्नल असलेल्या वैद्यांनी खिळखिळे करुन टाकले. ते सुद्धा डेक्कन हॉर्स जवळील जुन्या “शेरमन” रणगाड्याच्या सहाय्याने, खेमकरण विभागात पाकिस्तानचे ३६ रणगाडे उडवले.

६ सप्टेंबर १९६५ रोजी अतुल शौर्याबद्दल त्यांना महावीरचक (व्हिक्टोरिया क्रॉस सदृश) मिळाले. त्यांची बदली ईस्टर्न कमांडमध्ये त्रिपुरा, आसाममध्ये नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याकरता झाली. तिथे योजना चातुर्य दाखवून त्यांनी नागांचा तथाकथित जनरल मोबू अंगामी व इतर सशस्त्र नागांना पकडले. सन १९७१ साली, सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुख म्हणून वसंतार नदीवर पाकिस्तानचे सैन्याशी घनघोर लढाई झाली आणी पाकिस्तानच्या सैन्याला धुळ चारली.

१ ऑगस्ट १९८३ रोजी भारताचे जनरल म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली. “जनरल” म्हणून त्यांची एक विशिष्ट कामगिरी वाखाणण्यासारखी होती. २०,००० फूटांवर अतिशित, जिथे तापमान उणे ४०° असते अशा “सियाचीन” प्रदेशात लढाईस तयार करण्यात आलेली हिंदुस्थानी सेना तळ ठोकुन बसली होती.

रशियन बनावटीच्या टी-७२ बरोबरीचा अर्जुन रणगाडा तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यूस्टार यशस्वी केले.

अरुणकुमार वैद्य यांना संगीताची आवड होती. त्यांना पोस्टाची तिकिटे जमवण्याचा त्यांना छंद होता. सुमारे दहा हजार तिकिटांचा संग्रह त्यांचेपाशी होता. भारतीय भूदलातून निवृत्त झाल्यावर अरुण वैद्य पुण्यात स्थायिक झाले. १० ऑगस्ट १९८६ रोजी बाजारातून घरी परतत असताना दुचाकीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बंदुकीतुन ८ गोळ्या झाडल्या.

वैद्यांना डोक्यात आणि मानेत गोळ्या लागल्या व त्यांचे घटनास्थळीच निधन झाले.

अशा या पराक्रमी आणि शूर नौदल प्रमुखास शतश: नमन!

-संकलित

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 12:03 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 10-08-2026 News publication date | Time: 12:03 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement