नामवंत क्रिकेटपटू विजय हजारे यांचा १८ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
विजय हजारे यांचा जन्म ११ मार्च १९१५ रोजी सांगलीमध्ये झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९५१-५२मध्ये मद्रास येथे इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवला होता. त्यांनी १९४६ ते १९५३दरम्यान ३० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी १४ सामन्यांमध्ये त्यांनी कर्णधारपद भूषवले. १९४७-४८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकाच कसोटी सामन्याच्या (ॲडलेड) दोन्ही डावांत शतके झळकावणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यांत शतके ठोकण्याचा विक्रमही त्यांनी केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक (३१६ धावा) झळकावणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. १९६०मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. १८ डिसेंबर २००४ रोजी वडोदरा येथे दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या स्मरणार्थ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २००२-०३मध्ये देशांतर्गत एकदिवसीय (५० षटके) स्पर्धेला 'विजय हजारे ट्रॉफी' असे नाव दिले. ही स्पर्धा भारतात दर वर्षी राज्य स्तरावरील संघांमध्ये खेळवली जाते. २०२५-२६चा हंगाम डिसेंबर २०२५ मध्ये सुरू झाला आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment