पन्हाळा परिसरातील दगडी स्तंभांचे अनोखे विश्व - निसर्गाचा लाखो वर्षांचा चमत्कार

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात, मसाई पठाराच्या पश्चिमेकडील परिसरात उभ्या असलेल्या नैसर्गिक दगडी स्तंभांनी पुन्हा एकदा पर्यटक आणि भूगर्भशास्त्र अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. उतरंड परिसरातील हे ज्वालामुखीजन्य दगडी स्तंभ लाखो वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय प्रक्रियेचे जिवंत उदाहरण मानले जातात.

पन्हाळा परिसरातील दगडी स्तंभांचे अनोखे विश्व - निसर्गाचा लाखो वर्षांचा चमत्कार  मुख्य फोटो
पन्हाळा परिसरातील दगडी स्तंभांचे अनोखे विश्व - निसर्गाचा लाखो वर्षांचा चमत्कार  अतिरिक्त फोटो

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात, मसाई पठाराच्या पश्चिमेकडील परिसरात उभ्या असलेल्या नैसर्गिक दगडी स्तंभांनी पुन्हा एकदा पर्यटक आणि भूगर्भशास्त्र अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. उतरंड परिसरातील हे ज्वालामुखीय दगडी स्तंभ लाखो वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय प्रक्रियेचे जिवंत उदाहरण मानले जातात.


भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, सुमारे ६०.५६ दशलक्ष वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानंतर लाव्हा थंड होताना तयार झालेल्या खडकांवर हवामान, पाऊस आणि वाऱ्याच्या सातत्यपूर्ण परिणामामुळे आज दिसणारे उंच, सडसडीत दगडी स्तंभ निर्माण झाले. काही स्तंभ इतके समांतर आणि रेखीव आहेत की ते मानवनिर्मित असल्याचा भास होतो. या परिसरात शेकडो दगडी स्तंभ विविध आकारांत पाहायला मिळतात. काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या तयार झालेली दगडी कमान, खिडकीसारखी रचना तसेच पोकळ स्तंभ विशेष आकर्षण ठरतात. स्थानिकांच्या मते, काही दगडांवर हलके ठोके दिल्यास वेगवेगळ्या ध्वनीलहरी ऐकू येतात, त्यामुळे या ठिकाणाबाबत पर्यटकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. या भागाशी स्थानिक धार्मिक श्रद्धाही जोडल्या गेल्या आहेत. परिसरात कोअरी (कुबारी) देवीचे मंदिर असून, अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे हे ठिकाण निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा यांचा संगम म्हणूनही ओळखले जाते. पर्यटन अभ्यासकांच्या मते, पन्हाळा किल्ला आणि मसाई पठार पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या दगडी स्तंभांच्या परिसरालाही आवर्जून भेट द्यावी. अद्याप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी न मिळाल्याने हा नैसर्गिक वारसा तुलनेने दुर्लक्षित राहिला आहे. योग्य संवर्धन आणि पर्यटन विकास झाल्यास हा परिसर कोल्हापूरच्या महत्त्वाच्या भू-पर्यटन स्थळांपैकी एक ठरू शकतो. निसर्गाने लाखो वर्षांच्या कालखंडात घडवून आणलेली ही दगडी शिल्पे केवळ पर्यटनाचे आकर्षण नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध भूवैज्ञानिक वारशाची मौल्यवान ओळख आहेत.


या ठिकाणी पोहोचण्यासाठी पन्हाळा–बांदीवडे मार्ग, वाघबीळ–राखी मार्ग तसेच आंबवडे–खोतवाडी मार्गाचा वापर करता येतो. कोल्हापूर शहरापासून हे अंतर सुमारे ३० ते ३५ किलोमीटर आहे.


हे ठिकाण पन्हाळगडापासून साधारणपणे २० ते २२ किमी अंतरावर आहे.


मार्ग: पन्हाळा किल्ला ते मसाई पठार (Masai Plateau) असा रस्ता आहे. बांदिवडे गावाच्या मागील बाजूस असलेल्या मसाई पठाराच्या टोकावर हे स्तंभ आढळतात.


जाण्याची पद्धत:


१. तुम्ही पन्हाळा ते बांदिवडे खाजगी वाहनाने (कार/बाईक) जाऊ शकता.


२. गावातील शेतांच्या कच्च्या रस्त्यावरून साधारण ३० मिनिटे पायी चालावे लागते.


३. त्यानंतर खडकाळ पायऱ्या व रस्त्यातून ५-१० मिनिटांची चढण चढून तुम्ही प्रत्यक्ष स्तंभांपर्यंत पोहोचू शकता.


-संकलित

Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 11:14 AM News publication time | Views: 76 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 11:14 AM News publication time | Views: 76 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement