वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. २००३ मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी घेऊन ५० वर्ष पूर्ण झाली होती. कांचीपुरम मठाद्वारे अनेक शाळा आणि नेत्र रुग्णालये चालविले जातात.
जयेंद्र सरस्वती यांचे मूळ नाव सुब्रहमण्यम महादेव अय्यर. शंकराचार्य झाल्यानंतर त्यांचं नामकरण जयेंद्र सरस्वती असं करण्यात आलं होतं. जयेंद्र सरस्वती हे कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. २००३ मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी घेऊन ५० वर्ष पूर्ण झाली होती. कांचीपुरम मठाद्वारे अनेक शाळा आणि नेत्र रुग्णालये चालविले जातात. २००४ मध्ये कांचीपुरम वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकरारमन हत्या प्रकरणात जयेंद्र सरस्वती यांचे नाव आले होते. या प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यांनी दोन महिने कारावासही भोगला. मात्र सुनावणीदरम्यान १८९ साक्षीदारांपैकी ८० साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने न्यायालयाने त्यांची २०१३ मध्ये या आरोपातून मुक्तता केली होती. अयोध्येत राम मंदिर व्हावे म्हणूनही ते आग्रही होते. त्यासाठी त्यांनी तामिळनाडूतील हिंदू जागृती परिषदेत सत्ता बदल करण्याचे आवाहन केले होते. राम मंदिरासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी स्तुती केली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छाही त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री, दिवंगत जयललिता यांचे ते अध्यात्मिक गुरू होते. २००१ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर जयललिता यांनी चार वर्षानंतर आंध्रप्रदेशातील पोलिसांना पाठवून शंकराचार्यांना अटक करून चेन्नईत आणले होते. शंकरारमन हत्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र जयललिता यांच्या सहकाऱ्यांची मठाच्या जमिनीवर नजर होती, म्हणूनच त्यांना अटक करण्यात आली होती, अशी सुद्धा चर्चा होती. जयेंद्र सरस्वती यांचं २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झाले.
संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment