शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.

स्वामी विवेकानंदांचा विचार

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. मुख्य फोटो
मुख्य फोटो

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.

- स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचा हा सुविचार अगदी सार्थ आहे. आपल्या जीवनात निराश न होता जो मार्गक्रमण करत राहतो, तोच खरा यशस्वी होतो. जीवनात संकटे कोणासमोर येत नाहीत? परंतु अशा संकटसमयी जो माणूस रडत न बसता संकटांना सामोरा जातो. तोच यशस्वी होतो. अशी व्यक्ती परिस्थिती आली म्हणून रडत बसत नाही, तर त्यातून घडण्याचे धैर्य दाखवते. अपयश, अडथळे आणि संकटे ही शिकण्याची पायरी आहेत. साधनांची कमतरता असली, तरी इच्छाशक्तीला मर्यादा नसतात.

स्वतःवरचा विश्वास हीच सर्वांत मोठी ताकद असते. कर्तृत्ववान माणसे संधीची वाट पाहत नाहीत, तर संधी निर्माण करतात. परिश्रम, चिकाटी आणि संयम यांच्या जोरावर ते पुढे जात राहतात. लोकांची टीका अशा लोकांना थांबवू शकत नाही, उलट अधिक प्रेरणा देतात. अशा व्यक्तीला यश सहज मिळत नाही. अशा माणसांचे स्वप्न फक्त स्वतःपुरते मर्यादित नसते.

समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ त्यांच्या मनात असते. ते आपल्या कर्तृत्वातून इतरांनाही प्रेरणा देत असतात. अंधारातही प्रकाशाचा मार्ग शोधण्याची कला त्यांना अवगत असते. असा शून्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास इतिहास घडवतो. म्हणूनच शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्तीच खरी कर्तृत्ववान ठरते.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 5 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 5 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement