बोधकथा - ३२
स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे. एकदा ते वाराणसीतील दुर्गा मंदिरातून परतत असताना, एका अरुंद रस्त्यावर माकडांच्या आक्रमक कळपाने त्यांना वेढले. माकडे त्यांच्या अंगावर धावून येत होती आणि हातातील प्रसाद हिसकावण्याचा प्रयत्न करत होती.
भीतीपोटी विवेकानंद पळू लागले. ते जितक्या वेगाने पळत होते, तितक्याच वेगाने माकडे त्यांच्या मागे येत होती आणि त्यांना चावण्याचा प्रयत्न करत होती.
तेव्हा जवळच असलेल्या एका वृद्ध साधूने त्यांना ओरडून सांगितले, 'पळून जाऊ नकोस, निर्भीडपणे सामोरा जा.'
साधूचा सल्ला ऐकून विवेकानंद अचानक थांबले आणि त्यांनी वळून निडरपणे माकडांकडे पाहण्यास सुरुवात केली. यामुळे माकडे घाबरली आणि पळून गेली.
बोध : आयुष्यातील संकटांपासून किंवा भीतीपासून पळून न जाता, धैर्याने सामोरे गेल्यास संकट पळून जाते. आपल्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी तिच्याशी सामना करणे हाच एकमेव मार्ग आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment