अहिल्यानगरमधील नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी. त्यांनी ज्ञानेश्वरी येथेच लिहिली. त्या ठिकाणाविषयी...
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका म्हणजे संतपरंपरेतील अत्यंत पवित्र स्थान. येथेच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) या महान ग्रंथाचे लेखन केले. त्यामुळे नेवासा हे वारकरी संप्रदायात अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
नेवासा येथील या मंदिरात एक दगडी खांब आहे. त्याला पैस खांब म्हणतात. असे म्हणतात, की संत ज्ञानेश्वर महाराज या खांबाला टेकून बसून ज्ञानेश्वरी लिहीत होते. हा खांब आजही मंदिरात जतन करून ठेवलेला आहे आणि भाविक त्याचे दर्शन घेतात. कारण हा खांब ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा साक्षीदार मानला जातो.
येथे दर्शन घेतल्याने ज्ञानप्राप्ती होते, मनःशांती मिळते, भक्तिभाव वाढतो असा अनुभव आहे. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. हे ठिकाण प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिरात पैस खांब आणि संत ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे.
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आजही लाखो लोक रोज ज्ञानेश्वरी वाचतात. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञान, भक्ती आणि जीवनमार्ग यांचा संगम आहे. म्हणूनच सामान्य माणसासाठी अध्यात्माचा तो सोपा मार्ग आहे. संस्कृतमधील गीता मराठीत आणून संत ज्ञानेश्वरांनी धर्म लोकांपर्यंत पोहोचवला.
अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी आणि नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खडिलकर यांनी नुकतीच या ठिकाणाला भेट दिली. प्रत्येकाने येथे आवर्जून भेट द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment